दीपक केसरकर यांचा मोठा निर्णयः
सोमवारी केसरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाठ्यपुस्तकाची तीन भागात विभागणी केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाठ्यपुस्तकाची तीन भागात विभागणी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र पुस्तकाची विभागणी केल्यानंतर सुदिधा ओझ्याचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे विभागणी केलेल्या पाठ्यपुस्तकालाच लिखाणासाठी वहिची पानं जोडण्याचा विचार सुरू आहे. वहीची पाने जोडल्यानंतर लिहिण्यासाठी अथवा नोट्स काढण्यासाठी स्वतंत्रपणे वही बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
पुस्तकांनाच जोडणार वहिची पानेः
दरम्यान, या निर्णयावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आहे. शालेय शिक्षण विभाग या प्रस्तावा संदर्भात विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हा निर्णय अंतिम झाल्यास राज्यातील विद्यार्थी आणि पालकांची मोठी सोय होणार असल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
This news is co-provided by Janpratisadnews