सांगली जिल्ह्यातील कोविड-19 व इन्फ्लुएंजा या रोगांच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांनी, मास्कचा वापर करावा.-- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )

     सांगली जिल्ह्यातील सध्या परिस्थितीत covid-19 व इन्फ्लुएंजा आजारांच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर करून, सामाजिक अंतर ठेवून, सॅनिटायझर चा वापर करून, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन परिपत्रकान्वये सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या (seasonal Influenza) आजार आणि कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविण्याकामी शासनाच्या आरोग्य विभागाने आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करण्याबाबत सूचित केले आहे. गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एस.टी. स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे) इत्यादी ठिकाणी सर्व नागरकिांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

कोविड-19 व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्याचा त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. कोविड-19 विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन इत्यादी कारणामुळे होतो. या आजाराच्या अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेल्या तसेच ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण होऊन गेली आहे (post covid) अशा नागरिकांनी वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रूमाल धरावा. हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये आणि गरज नसताना गर्दीच्या व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.शासनाच्या निर्देशानुसार या आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय/निमशासकीय कार्यालये, तसेच बँका, शाळा, महाविद्यालये इत्यादी मधील सर्व शासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top