मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही कारणाने पदावरून पाय उतार झाले तर, एबीपी न्यूज सी -व्होटर च्या सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे जाहीर.--

0

  

 जनप्रतिसाद न्यज नेटवर्क 

( अनिल जोशी )


 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जर मुख्यमंत्रीपदावरून, काहीही कारणाने पाय उतार व्हावे लागले तर ,एबीपी न्यूज सी -व्होटर सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पदावरून पाय उतार झाले तर, नजीकची राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने जाऊ शकतात ?याचा एबीपी न्यूज सी -व्होटर चा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.:-

 भारतीय जनता पार्टी व शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊ शकतात.- 19%. 

भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ शकतात.- 12% 

महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकतील .-19% 

मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.- 32% 

पुढील स्थिती काय होणार? काहीही माहिती नाही.- 18% 

दरम्यान एबीपी न्यूज सी -व्होटर च्या सर्वेक्षणात, 19 टक्के लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षानं उद्धव ठाकरे गटाशी हात मिळवणी करावी. राजकीय जुने हेवे- दावे सोडून नवीन युती करावेी. 12 टक्के लोकांनी, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं. 19 टक्के लोकांनी पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने, सरकार स्थापन करावे. विशेष म्हणजे 32 टक्के लोकांनी मध्यावधी निवडणुकीतून, जनतेचा खरा कौल आजमावा असे वाटत असल्याचे म्हटले आहे. 18 टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पदावरून पाय उतार झाल्यास ,महाराष्ट्रातील नेमकी परिस्थिती काय होईल? हे कळत नसल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top